केवायसी पूर्ण होऊनही पैसे जमा होण्यास विलंब; तांत्रिक अडचणी आणि निधी वितरणातील दिरंगाईमुळे शेतकरी चिंतेत.
राज्यातील अनेक भागांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, अनुदानाचे पैसे अद्याप बँक खात्यात जमा न झाल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. “आम्ही केवायसी केली, आता पैसे कधी पडणार?” हा एकच प्रश्न सध्या अनेक शेतकरी विचारत आहेत.
















